अमरावती : कर्ज वितरण प्रक्रियेत अधिकाधिक लोकांना लाभ मिळावा, ही राज्य सरकारची भूमिका आहे. या लाभापासून कुणीही पात्र व्यक्ती वंचित राहू नये, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी बँक प्रतिनिधींना दिले.
खरीप पिकांसाठी निविष्ठा घेण्याकरिता मिळणाऱ्या १० हजार रुपयांच्या तातडीच्या कर्जाचा कर्जमाफीच्या लाभावर परिणाम होणार नाही, असेही या वेळी स्पष्ट करण्यात आले. ‘कर्जवितरणाला गती देण्यासाठी प्रक्रियेत नेमकेपण व पारदर्शकता येण्यासाठी बँकांनी प्रयत्न करावेत. त्यासाठी २००९ ते २०१४ या कालावधीत पुनर्गठन न झालेल्या खातेदारांची आणि २०१४नंतर पुनर्गठन झालेल्या खातेदारांची बँकनिहाय आकडेवारी तात्काळ सादर करावी,’ असे निर्देश त्यांनी दिले.